कर्मवीर महाविद्यालय मूल येथे सुरक्षा रक्षक भर्तीची सुवर्ण संधी !






रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 

  सूक्ष्म लघु मंत्रालय  भारत  सरकारच्या
 उपक्रमांतर्गत आणि भारत सरकारच्या पसारा ऍक्ट 2005 च्या नियमाप्रमाणे स्थानिक तरुणांसाठी कायमस्वरूपी नोकरीसाठी आयएसओ मान्यताप्राप्त , भारत सरकारच्या पसारा मान्यताप्राप्त शिवस्वराज्य सेक्युरिटी अँड मॅन पॉवर सर्विसेस प्रा. लि.आणि  शिक्षण प्रसारक मंडळ मूल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूल, जि. चंद्रपूर.
 यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 नोव्हेंबर  २०२५ ते 23 नोव्हेंबर  २०२५ या कालावधीत सुरक्षा रक्षक  भरतीचे आयोजन  करण्यात आले आहे.
        या भरतीस बेरोजगार युवकांना पर्मनंट नोकरीं दिली जाणार आहे. त्याचबरोबर सर्व सुविधा ज्यामध्ये पी एफ सुविधा, मेडिकल, ग्रॅजुटी, पी एफ पेन्शन, विधवा पेन्शन, अनाथ पेन्शन व नियमानुसार भत्ते दिले जातील तसेच पेमेंट हे महाराष्ट्र गार्ड बोर्ड किंवा महाराष्ट्र मिनिमम वेज नियमाप्रमाणे मिळणार आहे . जे 16 हजार ते 25हजार पर्यंत सुरुवातीस मिळेल व सर्व सूविधा दिल्या जातील. भरती होणाऱ्या तरूणांना महाराष्ट्रामध्येच नौकरी दिली जाणार आहे.
      ही भरती प्रक्रिया दि.19 नोव्हेंबर २०२५ ते 23नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत  कर्मवीर महाविद्यालय,मूल. ता. मूल जि. चंद्रपूर येथे  सुरू राहणार आहे. तरी 23 नोव्हेंबर पर्यंत या सुवर्ण संधी चा लाभ जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी   घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिता वाळके व भरती अधिकारी महेश कुमार यांनी केले.भरती साठी पात्रता 1)शिक्षण :युवक हा कमीत कमी 10 वी पास असावा. 2)वय:किमान 20 वर्ष ते कमाल 45 वर्ष. 3) उंची:168 सेमी पेक्षा जास्त. 4)वजन 50 किलो पेक्षा जास्त. युवक हा मेडिकली फिट असावा.                                भरती साठी  कागदपत्रे:1)आधार कार्ड झेरॉक्स 2) ,10/12वी /ग्रॅज्युशन चे मार्कशीट पैकी 1 झेरॉक्स. 3) पासपोर्ट साईझ 2 फोटो घेऊन येणे.4)रेजिस्ट्रेशन फी 500रुपये (फक्त निवड होणाऱ्या युवकांसाठी ) जागा भरल्यानंतर भरती प्रक्रिया बंद केली जाईल. अधिक माहिती करिता या मोबाईल नंबर वर संपर्क करून 9552238057,786382136, 8888669598
या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी द्यावा व आपले भविष्य उज्ज्वल करावे, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिल वैरागडे व सचिव शशिकांत धर्माधिकारी यांनी आवाहन केले आहे.