चिरोली ग्राम पंचायत च्या वतीने केलेल्या कामाबाबत माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे भाजपाचे वसंत सादुलवार यांची तक्रार


ग्रामपंचायत चिरोली ला पाच वर्षात मिळाले होते १ कोटी ८२ लाख रुपये !
        
 

 रवि वाळके/दे दणका न्यूज मूल 
  
     पंचायत सामीती मूल अंतर्गत येणाऱ्या चिरोली ग्राम पंचायतीला सन २०२० ते सन २०२५ पर्यंत गावातील विविध विकास कामे करण्यासाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये शासनाकडून प्राप्त झाले. या निधीतून कामे करण्यात आली मात्र कामाचा दर्जा निकृष्ठ स्वरूपाचा असुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.त्यामुळे चिरोली येथील भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते वसंत सादुलवार यांनी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यपालन अधिकारी  यांचेकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

      शासन गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी थेट ग्राम पंचायतीच्या बँक खात्यात विकास निधी जमा करीत आहे. ग्राम पंचायत कमिटीचे सदस्य व ग्रामसेवक यांच्या  देखरेखीखाली गावचा विकास होईल हाच उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. मात्र ग्राम पंचायत चिरोली याला अपवाद आहे. सन २०२० ते २०२५ पर्यंत शासनाकडून विविध विकास कामांसाठी १ कोटी ८२ लाख १० हजार ७५३ रुपये प्राप्त झाले. यात कंत्राटदारांना हाताशी घेऊन ग्रामविकास अधिकारी विजय यारेवार यांनी स्वर्जीने कामे केल्याची चर्चा सुरू झाली आहे.लोकांच्या हिताच्या दृष्टीने एकही चांगले काम केले नसल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत.गावाच्या विकासासाठी आलेला निधी काही मोजक्या ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेत हा १ कोटी ८२ लाख रुपयांचा खेळ मांडला गेला आहे. आजच्या घडीला गावात फेरफटका मारला असता कामाचा दर्जा निकृष्ठ असल्याचा प्रत्यय दिसुन येत आहे. लेखी तक्रार 
आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्यकार्यपालन अधिकारी  यांचेकडे केली आहे.
 त्यामुळे चौकशीत काय निघणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे 


वसंत सादुलवार सामाजिक कार्यकर्ते चिरोली:- 
     
  ग्राम पंचायत चिरोलीला गाव विकासासाठी १ कोटी ८२ लाख  रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र या निधीतून बांधण्यात आलेले कामे निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत. मी स्वतः कामाकडे फेरफटका मारल्यानंतर दिसुन आले आहे. त्यामुळे भाजपाचा एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून मी आमदार सुधीर मुनगंटीवार व 
 जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  यांचे कडे लेखी तक्रार केली आहे. या कामाची चौकशी झाल्यास अनेक गैरव्यवहार उघड होण्याची शक्यता आहे.