८ ते १० हायवा ट्रक ने केली जात आहे वाहतूक
मूल तालुक्यातील भगवानपूर येथे मूरमाची भरमार वाहतूक केली जात असुन ८ ते १० हायवा ट्रक ने
प्रत्येक १० मिनिटाला एक हायवा दोन जेसीबी व एक पोकलँड च्या साह्याने वाहतूक केली जात आहे.त्यामुळे शेकडो ब्रास मुरूम एका दिवसात
उत्खनन केले जात आहे .कंत्राटदाराने काढलेल्या ७०० ब्रास मुरूमचा खनिज परवानाचा मुरूम केव्हाच खोदून टाकण्यात आला आहे. पुन्हा हजारो ब्रास मुरूम काढण्याचा डाव आखला जात असुन तहसीलदाराने लक्ष घालुन खोदलेल्या जागेची चौकशी करण्याची मागणी जनतेनी केली आहे.
चिरोली ते केळझर रस्त्याचे काम सुरू आहे. याच कामाबरोबरच इतरही कामासाठी ईईल आय डी सी सी कंपनीने ५०० ब्रास व शालिक दहिवले यांनी २०० ब्रास मुरुमाचा खनिज परवाना काढला आहे. मात्र दर १० मिनिटाला ८ ते १० हायवा ट्रक ने खोदून मुरूम टाकला जात आहे.७०० ब्रास मुरूम केव्हाच खोदून टाकण्यात आल्यावर देखील पुन्हा हजारो ब्रास मुरूम टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे करोडो रुपयांच्या महसूलावर पाणी फेरल्या जात आहे. याबाबत चौकशी करून सबंधित परवानाधारकावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे
