पाच वर्षांत नुकतेच गवतच वाढले,वनविभागाचा भोंगळ कारभार !

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष महत्वाची भुमिका पार पाडत असतात हे हेरून वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेत मूल शहरानजीक कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३o हेक्टर जागेत ३३ हजार झाडे लावण्यात आली. ५ वर्षात झाडांच्या वाढ होणे गरजेचे असताना त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाल्याने लावलेली झाडे कोमेजली. माञ त्यात गवत व अनावश्यक झाडे उगविल्याने वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम ससफेल ठरला आहे.

वक्षांचे संवर्धन झाले तर वन्य प्राण्यांचे अधिवास सुरक्षित होते. यासाठी वनविभाग वृक्ष संवर्धन करण्यासाठी दरवर्षी लाखो वृक्षांचे वृक्षारोपण केले जाते. ज्या जोशात वृक्षारोपण केले जाते त्याच तत्परतेने कर्मचाऱ्यावर जबाबदारी देवुन लावलेल्या सगळ्या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी बाध्य करणे आवश्यक आहे. माञ असला प्रकार होत नसल्याने वृक्ष संवर्धन होत नसल्याची ओरड सुरू आहे. तत्कालीन वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर यांच्या काळात   मूल शहरानजीक असलेल्या कक्ष क्रमांक ७५२ मध्ये सन २०१९ ला ३० हेक्टर जागेत ३३ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वेळोवेळी वृक्ष संवर्धनावर लाखो रूपये खर्च करण्यात आले. माञ वृक्ष संवर्धन होऊ शकले नाही. वृक्ष देखभाल करण्याचा कालावधी पाच वर्षाचा या शेवटच्या वर्षात वृक्ष कमी व गवत जास्त अशी स्थिती दिसत आहे.३३ हजार झाडापैकी बोटावर मोजण्याइतके झाडे शिल्लक असल्याचे दिसुन येते. जिवंत झाडाच्या सभोताल कचरा वाढलेला आहे माञ वन कर्मचारी झाडा समोरील कचरा काढण्याचे साधे सौजन्य दाखवीत नसल्याने वृक्ष लागवडीचा महत्वपुर्ण कार्यक्रम ससफेल ठरत असल्याचे यावरून दिसुन येते.